Posts

२ गुंठे

तेव्हा शासनाचा सॅटेलाईट जमीन मोजणी व Online 7/12 प्रकल्प प्रायोगिक तत्वावर मुळशी तालुक्यात सुरु झाला होता.नविन प्रकल्प असल्यामुळे तांत्रिक चुका होणारच,हे गृहित धरुन शासनाने हरकत निवारण केले जाईल, असे सांगितले होते.   यथासांग तलाठ्याने नविन कागदपत्रे दिली.बघतो तर काय 7/12वर  दुस-याचेच नाव लागलेलं. रितसर अर्ज केला व आमची नावे लावून घेतली.                  आता नव्याने पुन्हा आलेल्या 7/12वर चेक केलं तर 6.28एकर मधून 2गुंठे क्षेत्र गायब झालेलं. पुन्हा मंडल अधिका-याकडे अर्ज घेऊन गेलो. त्यांना म्हटले,"सर,मागच्या वेळेस मालक गायब केला.आता 2गुंठे जमीनच चोरीला गेली." ते म्हणाले,"बघू."7/12 दाखवला. ते म्हणाले," अरे,तुमची तर पावणे सात एकर जागा आहे.2गुंठ्याने काय एवढा फरक पडतो?" (पाहा कामचूकारपणाचे आणि चूक लपवण्याचे उदाहरण ) मी-सर, बांधाच्या एक एक फूटावरुन भावकी एकमेकांच्या जीवावर उठते आणि मी 2 गुंठे दुस-याला सोडू?? साहेब-तेही खरंच आहे म्हणा.बघू अर्ज. असं म्हणत त्यांनी अर्ज दाखल करुन घेतला.

#वपुर्झा

प्रॉब्लेम्स नसतात कुणाला? ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, कधी माणसे तर कधी तंत्रज्ञान या चार गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो.

Bikini

दीपिका पदुकोणने हिरव्या रंगाच्या बिकिनीचे फोटो पोस्ट करुन वाद मिटवावा.

टेमघर

मुळशी तालुक्यातील टेमघर जलायशयाला(धरणाला)        " सरदार दयाजीराव मारणे जलाशय" असे नाव द्यावे,अशी माझी मनोमन इच्छा आहे.

Indian

We are Indians,Firstly & Lastly. पण ह्यामध्ये मग प्रत्येकाचा धर्म जात वर्ण लिंग भाषा प्रांतीय अस्मिता राजकीय पक्ष ह्यांचा प्रवेश होतो आणि कदाचित भारतात असल्यामुळे  आपण विसरुन जातो की, आपण भारतीय आहोत.

Sympathy

Practical माणसांना मनापासून Sympathy देता येत नाही.

18 ते 21

मुलीचे वय 18 वरुन 21वर्षे केलं.त्याबद्दल माझे मत : 1)आधी बाप असा विचार करायचा की, कधी मुलीचे वय 18 होतंय आणि मी तीचं लग्न लावून मोकळा होतोय. पण आता 21 वय केल्यावर  बाप पहिला असा  विचार  करेल की,"असं न् तसं 21वर्षे मुलीला घरात ठेवायचीये/सांभाळयचीये तर तिला किमान 12वी शिकवू व पुढेमागे कोर्स देऊ किंवा काॅलेज जवळ असेल तर 15वी शिकवूच." ह्याने काय होईल कि,हिमालयासारखा बाप मागे असेल तर मुली नक्कीच शिकतील.स्वतःचे ध्येय पूर्ण करतील. -मुलींचे उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढेल.मुली त्यांच्या घरातून गावातून नाही तर Comfort zone मधून बाहेर पडतील. 2)18वर्षे पूर्ण झाल्यावरच मुलीचे लग्न झालं पाहिजे हा  कायदा असूनही 15-16-17वर्षे वय असताना  कितीतरी बाललग्ने ग्रामीण भागात व मागास जातींमध्ये दिसून येतात. नविन सुधारणेने 21जाऊद्या  किमान 18-19पर्यंत तरी नक्कीच होतील.(मागील कायद्याचा बॅकलाॅग नविन सुधारणेने भरुन काढला, असे म्हणता येईल.) -18वय म्हणजे मुलगीच काय मुलीच्या बापाने पण 'जग बघीतलेलं नसेल'.त्यामुळे जरा त्यांना सामाजिक- व्यवहारिकदृष्ट्या Mature होऊद्या, बाहेरच्या जगाशी अपड...