Posts

Showing posts from August, 2023

NDA

17 Sept 2016 सर्वाना विनंती की ट्रेनिंगसाठी आपल्या गावातून ये-जा करणारया NDAच्या विद्यार्थ्याना-सैनिकांना माणूसकीच्या दृष्टीकोनातून मदत करावी. काल रात्री आमच्या घराच्या ओट्यावर बसलेल्या सैनिकांना  पाणी देऊ केलं रस्ता दाखवला... देशसेवा केल्याचं समाधान झालं. आज पहाटे 4.30 वा एक तुकडी गावातील एका माणसाला विनंती करित होती की आमच्यातील दोघे जण खूप दमलेले आहेत.इतके की त्याना चालणे अशक्यच आहे.एवढ्या ओझ्यासह त्यांना चालणे अवघड आहे.तुमच्या गाडीतून आम्हाला गोंधळवाडीला सोडा तिथे आमची गाडी आहे. पण हा माणूस घाबरला असावा उगाच मिलिटरीने आपली गाडी जप्त वगैरे केली तर?? ह्याने नकार दिला.त्यांनी सामानाची अदलाबदल केली त्या दोघांना 2-2खांदे दिले आणि पावसात पुढे चालू लागले.लाज वाटते आपल्या अशा वागणूकीमुळे त्याना नक्कीच प्रश्न पडला असेल आपण इतके खडतर कष्ट करतोय पण  कुणाला त्याची जाणच नाही कदरच नाही.अशा लोकांसाठी आपले कष्ट वाया तर नाही ना गेले?  खरंच विचार करा मित्रहो,मिसरुडही न फुटलेली घरादाराचा त्याग करुन भारताच्या कानाकोपरयातून देशसेवेसाठी आलेली ही मुलं.सणवार,ऊन- वारा-पाऊस काही बघत नाहीत.ते आ...

एक दिवस शाळेसाठी

13 Oct 2016 "एक दिवस शाळेसाठी" ह्या स्वयंघोषित उपक्रमांतर्गत ग्रामीण भागात असलेल्या मुळशी तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हजर झालो.(चांगल्या कामासाठी मुहूर्त लागत नाही कारण दसरा कधी आला नि गेला ते पण कळाले नाही.) परिपाठ झाल्यावर चौथीच्या वर्गावर इतिहास शिकवायला गेलो.पाहतो तर फक्त 8 विद्यार्थी.बहुधा फॅमिली प्लॅनिंग(strike rate कमी झाला) आणि इंग्लिश मिडियमचे फॅड ही कारणे असावीत.आमच्या वेळेस तर प्रत्येक वर्गात 40-45 जण तर हमखास असायचे(उगाच नाही भारत लोकसंख्येच्या बाबतीत दुसरया नंबरवर आहे.) शिवाजी महाराजांबद्दल मुलांना खूप कमी माहिती होती किंवा 10 वर्षाच्या मुलांकडून माझी अपेक्षा जास्त असावी. पुण्यामध्ये लालमहाल, सारसबाग, शनिवारवाडा आहे हे 8 विद्यार्थ्यांमध्ये फक्त एका मुलीला माहित होते. ते स्वतः राहत असलेल्या मुळशी तालुक्याविषयी त्यांना अक्षरशः काहीच माहिती नव्हती. चाॅकलेट खाल्यावर कागदाचे काय करता असे विचारले असता फेकून देतो असे 'नॅचरल'  उत्तर सर्वानी दिले. मग रस्त्यावरचा कचरा उचलू शकत नाही तर किमान कचरा तरी करणार नाही.यासाठी स्वतःचा कचरा स्वतःज...

उतारा

भोंदू-भगतांनी लिंबू-नारळ उतरवून टाकायला सांगण्याऐवजी लिंबाचा रस व नारळ पाणी पिऊन खोबरे खाऊन;  मग उरलेला लिंबू-नारळ उतरवायला  सांगितले असते ना, तरी लय जीव वाचले असते.

No -Broker

वेबसाईटचे नाव आहे No-Broker. पण Broker चीच खोगिरभरती जास्त आहे.