Posts

Showing posts from July, 2021

शेतकरी

प्रत्येक शेतकरी बांधवांनी कृषिक्षित बनले पाहिजे.

ती एक रात्र

एप्रिल 2012 मधील घटना आहे ही. माझी B.Sc Third Year ची शेवटची परीक्षा होती.परीक्षा ज्या दिवशी संपत होती त्याच्या दुस-या दिवशी हेमंतच्या बहिणीचे लग्न होते. फक्त परीक्षाच नाही माझी काॅलेज लाईफ पण पण संपली होती. लग्नाच्या निमित्ताने रिफ्रेशमेंट मिळणार होती;नविन जिल्हा,नविन प्रदेश. ठरवले की लग्नाला जायचंच. हेमंत म्हणालेला की- पुण्यातून नांदगावला यायला 7 तास लागतात.लग्न सकाळी 11वाजता आहे.त्यामुळे तू आदल्या दिवशीच निघ. अलंकार पण निघणार आहे. पण तो रेल्वेने जाणार होता. मला रेल्वेपेक्षा एसटी मध्ये कंफर्ट व सेफ वाटते.त्यामुळे मी अलंकारला नाही म्हटले. आदल्या दिवशी मी बोटा या गावी माझ्या चुलत मामाच्या गावी मुक्काम करुन  एकूण प्रवासातले 3.30तास मी कव्हर करणार होतो व बाकी प्रवास दुस-या दिवशी करणार होतो. ह्या चुलत मामाकडे मी कधी गेलो नव्हतो.घरचे जाऊन आलेले होते.माझी त्यांच्याशी ओळख होईल म्हणून मी माझा मुक्काम बोट्याला करायचा ठरवले .घरचे बरेच दिवस झालेले बोट्याला जाऊन आलेले.त्यांना पण बरं वाटले की मी जातोय म्हटल्यावर.पप्पांकडून त्या दोन मामांचे फोन नंबर घेतले.बॅग वगैरे रात्रीच भरुन ठेवली. सकाळी उठू...

Via

जुलै २०१० मधील प्रसंग आहे हा. मी व माझा मित्र तुषार पौड(ता.मुळशी) पालीला देवदर्शनाला एसटीने गेलेलो.येताना रात्र झाली म्हणून भागाड(ता.माणगाव)ला चुलत्यांकडे मुक्कामी राहिलो.सकाळी  माघारी निघणार होतो पण चुलते म्हणाले,"ताईला चिपळूणला नर्सिंगच्या संस्थेत सोडून ये.तिथली व्यवस्था कशी आहे ते पाहा" तुषारला म्हटले जायचे का ? तो म्हणला जाऊत. मग ताई,काकू व आम्ही दोघे निघालो. माणगाववरुन चिपळूण गाडी मिळाली.अर्धी गाडी रिकामीच होती. महाड सोडले व मुसळधार पाऊस सुरु झाला.एसटी चा ड्रायव्हर सुसाट गाडी पळवत होता.मुळशीमध्ये राहून तुषारने असा पाऊस बहुतेक पाहिला नव्हता.त्याला भिती वाटली.तो जोराने ओरडला-'ड्रायव्हर, गाडी जरा हळू घ्या.'पण ड्रायव्हरला काय आवाज ऐकू गेला नाय. तो त्याच्याच धुंदीत.गाडी चिपळूणमध्ये आली. चिपळूणला तीन स्टँड आहेत हे पहिल्यांदाच कळाले.नक्की ती संस्था कुठे आहे माहित नव्हते.मग दोन नंबरच्या स्टँडला उतरण्याचा मध्यम मार्ग निवडला.गाडीतून उतरलो व मग रिक्षा करुन त्या संस्थेत आलो.जवळच होते.ताईचे बि-हाड ठेऊन तिचा निरोप घेऊन आम्ही माघारी आलो.बराच वेळ झाला महाड- माणगावला जाणारी गाडी ...