मुलीचे वय 18 वरुन 21वर्षे केलं.त्याबद्दल माझे मत : 1)आधी बाप असा विचार करायचा की, कधी मुलीचे वय 18 होतंय आणि मी तीचं लग्न लावून मोकळा होतोय. पण आता 21 वय केल्यावर बाप पहिला असा विचार करेल की,"असं न् तसं 21वर्षे मुलीला घरात ठेवायचीये/सांभाळयचीये तर तिला किमान 12वी शिकवू व पुढेमागे कोर्स देऊ किंवा काॅलेज जवळ असेल तर 15वी शिकवूच." ह्याने काय होईल कि,हिमालयासारखा बाप मागे असेल तर मुली नक्कीच शिकतील.स्वतःचे ध्येय पूर्ण करतील. -मुलींचे उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढेल.मुली त्यांच्या घरातून गावातून नाही तर Comfort zone मधून बाहेर पडतील. 2)18वर्षे पूर्ण झाल्यावरच मुलीचे लग्न झालं पाहिजे हा कायदा असूनही 15-16-17वर्षे वय असताना कितीतरी बाललग्ने ग्रामीण भागात व मागास जातींमध्ये दिसून येतात. नविन सुधारणेने 21जाऊद्या किमान 18-19पर्यंत तरी नक्कीच होतील.(मागील कायद्याचा बॅकलाॅग नविन सुधारणेने भरुन काढला, असे म्हणता येईल.) -18वय म्हणजे मुलगीच काय मुलीच्या बापाने पण 'जग बघीतलेलं नसेल'.त्यामुळे जरा त्यांना सामाजिक- व्यवहारिकदृष्ट्या Mature होऊद्या, बाहेरच्या जगाशी अपड...