Posts

Indian

We are Indians,Firstly & Lastly. पण ह्यामध्ये मग प्रत्येकाचा धर्म जात वर्ण लिंग भाषा प्रांतीय अस्मिता राजकीय पक्ष ह्यांचा प्रवेश होतो आणि कदाचित भारतात असल्यामुळे  आपण विसरुन जातो की, आपण भारतीय आहोत.

Sympathy

Practical माणसांना मनापासून Sympathy देता येत नाही.

18 ते 21

मुलीचे वय 18 वरुन 21वर्षे केलं.त्याबद्दल माझे मत : 1)आधी बाप असा विचार करायचा की, कधी मुलीचे वय 18 होतंय आणि मी तीचं लग्न लावून मोकळा होतोय. पण आता 21 वय केल्यावर  बाप पहिला असा  विचार  करेल की,"असं न् तसं 21वर्षे मुलीला घरात ठेवायचीये/सांभाळयचीये तर तिला किमान 12वी शिकवू व पुढेमागे कोर्स देऊ किंवा काॅलेज जवळ असेल तर 15वी शिकवूच." ह्याने काय होईल कि,हिमालयासारखा बाप मागे असेल तर मुली नक्कीच शिकतील.स्वतःचे ध्येय पूर्ण करतील. -मुलींचे उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढेल.मुली त्यांच्या घरातून गावातून नाही तर Comfort zone मधून बाहेर पडतील. 2)18वर्षे पूर्ण झाल्यावरच मुलीचे लग्न झालं पाहिजे हा  कायदा असूनही 15-16-17वर्षे वय असताना  कितीतरी बाललग्ने ग्रामीण भागात व मागास जातींमध्ये दिसून येतात. नविन सुधारणेने 21जाऊद्या  किमान 18-19पर्यंत तरी नक्कीच होतील.(मागील कायद्याचा बॅकलाॅग नविन सुधारणेने भरुन काढला, असे म्हणता येईल.) -18वय म्हणजे मुलगीच काय मुलीच्या बापाने पण 'जग बघीतलेलं नसेल'.त्यामुळे जरा त्यांना सामाजिक- व्यवहारिकदृष्ट्या Mature होऊद्या, बाहेरच्या जगाशी अपड...

आयुष्य

आयुष्य खूप सुंदर आहे ; फक्त ऑलिंपिकमध्ये Gold Medal  मिळाले पाहिजे.

शेतकरी

प्रत्येक शेतकरी बांधवांनी कृषिक्षित बनले पाहिजे.

ती एक रात्र

एप्रिल 2012 मधील घटना आहे ही. माझी B.Sc Third Year ची शेवटची परीक्षा होती.परीक्षा ज्या दिवशी संपत होती त्याच्या दुस-या दिवशी हेमंतच्या बहिणीचे लग्न होते. फक्त परीक्षाच नाही माझी काॅलेज लाईफ पण पण संपली होती. लग्नाच्या निमित्ताने रिफ्रेशमेंट मिळणार होती;नविन जिल्हा,नविन प्रदेश. ठरवले की लग्नाला जायचंच. हेमंत म्हणालेला की- पुण्यातून नांदगावला यायला 7 तास लागतात.लग्न सकाळी 11वाजता आहे.त्यामुळे तू आदल्या दिवशीच निघ. अलंकार पण निघणार आहे. पण तो रेल्वेने जाणार होता. मला रेल्वेपेक्षा एसटी मध्ये कंफर्ट व सेफ वाटते.त्यामुळे मी अलंकारला नाही म्हटले. आदल्या दिवशी मी बोटा या गावी माझ्या चुलत मामाच्या गावी मुक्काम करुन  एकूण प्रवासातले 3.30तास मी कव्हर करणार होतो व बाकी प्रवास दुस-या दिवशी करणार होतो. ह्या चुलत मामाकडे मी कधी गेलो नव्हतो.घरचे जाऊन आलेले होते.माझी त्यांच्याशी ओळख होईल म्हणून मी माझा मुक्काम बोट्याला करायचा ठरवले .घरचे बरेच दिवस झालेले बोट्याला जाऊन आलेले.त्यांना पण बरं वाटले की मी जातोय म्हटल्यावर.पप्पांकडून त्या दोन मामांचे फोन नंबर घेतले.बॅग वगैरे रात्रीच भरुन ठेवली. सकाळी उठू...

Via

जुलै २०१० मधील प्रसंग आहे हा. मी व माझा मित्र तुषार पौड(ता.मुळशी) पालीला देवदर्शनाला एसटीने गेलेलो.येताना रात्र झाली म्हणून भागाड(ता.माणगाव)ला चुलत्यांकडे मुक्कामी राहिलो.सकाळी  माघारी निघणार होतो पण चुलते म्हणाले,"ताईला चिपळूणला नर्सिंगच्या संस्थेत सोडून ये.तिथली व्यवस्था कशी आहे ते पाहा" तुषारला म्हटले जायचे का ? तो म्हणला जाऊत. मग ताई,काकू व आम्ही दोघे निघालो. माणगाववरुन चिपळूण गाडी मिळाली.अर्धी गाडी रिकामीच होती. महाड सोडले व मुसळधार पाऊस सुरु झाला.एसटी चा ड्रायव्हर सुसाट गाडी पळवत होता.मुळशीमध्ये राहून तुषारने असा पाऊस बहुतेक पाहिला नव्हता.त्याला भिती वाटली.तो जोराने ओरडला-'ड्रायव्हर, गाडी जरा हळू घ्या.'पण ड्रायव्हरला काय आवाज ऐकू गेला नाय. तो त्याच्याच धुंदीत.गाडी चिपळूणमध्ये आली. चिपळूणला तीन स्टँड आहेत हे पहिल्यांदाच कळाले.नक्की ती संस्था कुठे आहे माहित नव्हते.मग दोन नंबरच्या स्टँडला उतरण्याचा मध्यम मार्ग निवडला.गाडीतून उतरलो व मग रिक्षा करुन त्या संस्थेत आलो.जवळच होते.ताईचे बि-हाड ठेऊन तिचा निरोप घेऊन आम्ही माघारी आलो.बराच वेळ झाला महाड- माणगावला जाणारी गाडी ...